Tuesday, November 4, 2008
बॉसची गाडी
Friday, August 15, 2008
प्रार्थना
दीप लावतो मी भक्तीचा ,
अंत:करणातील प्रेमाचा.
आशादीप हा तेवू दे
मन तुजचरणी रमू दे !
नको सावट दु:ख़ाचे
नांदी असावी सुख़ाची,
लक्ष्मी नांदावी घरी
नको शांतीची भ्रांती.
२४-११-१९९७ रोजी सुचलेली कविता
Saturday, May 3, 2008
दगड
नदीच्या काठी
पाण्यात ख़डे टाकत उमटलेल्या तरंगात
मी तुलाच पहात होतो.
आज तूच मला विचारतेस
"मी दगड आहेस का म्हणून?"
Thursday, March 20, 2008
Monday, December 10, 2007
वाडा
तारुण्याच्या उंबरठ्यावर वाड्याला त्यांनी सोडले,
पोटसाठी भटकले , वार्धक्याच्यावेळी परतले.
एकेकाळचा राजावाडा , आज भकास झालाय,
वाड्यातली माणसं भुतासारखी राह्तायत.
स्वत:चीच डागडुजी या माणसांना जमत नाही.
वाड्याची काय करणार ?
बाहेर गेलेल्या नव्या पीढीकडेच आशेनं पाहतायत,
भकासवाडा आणि त्यातली म्हातारी भुतंही
पण नवीन पाखरे त्यांच्याच नादात आहेत.
जीर्णोध्दाराची वाट पाहणे हेच वाड्याच्या नशीबी आहे.
"चैत्रपालवी " काव्यसंग्रहामधे प्रसिध्द
Wednesday, November 28, 2007
नातं
मला तुझ्याशी काही बोलायचंय
आकाशाचं नातं सांगायचंय ,
मानापमानाच्या झुल्यावर झुलतानाही
तुझ्या अंतःकरणात डोकवायचंय.
वाट तुझी जिद्दीची आहे
पण पुढे उखडलेली आहे.
हे तुला नसलं तरी , मला माहित आहे,
म्हणून मी अस्वस्थ आहे.
तुझ्या माझ्या मधील विश्वासाचा पूल
तुला नको आहे,
त्यामुळे माझे प्रेम हे एक
कोमेजलेले फ़ूल आहे.
हे फ़ूल फ़ुलवण्यासाठी
विश्वासाचा पूल बांधण्यासाठी ,
शब्दांच्या पाकळ्या या जुळवलेल्या आहेत
तरी यांचा तू अव्हेर करू नकोस.
मला तुझ्याशी काही बोलायचंय.......
'संध्या ' दिवाळी अंक १९९८ मध्ये प्रसिध्द.
Tuesday, November 27, 2007
'महाभारत'
कलियुगातला ध्रुतराष्ट्राचा धूर्तपणा
जेव्हा विधानसभेत येऊन बसला,
तेव्हा विरोधीपक्षही गान्धारीसारखा,
डोळ्यावर पट्टी बान्धुन बसला.
कित्येक शकूनीमामा येऊन गेले,
जमेल तेवढी खळगी भरुन गेले.
जनतेशी द्युत खेळत असताना,
ध्रुवपदा ऐवजी असलेले पद घालवुन बसले.
"द्रौपदी-वस्रहरण " करण्याच्या प्रयत्नात ,
स्वत:च्याच घोटाळ्याची प्रकरणे बाहेर पडली.
आम्ही पाण्डव वाट पहातोय श्रीकृष्णाची,
भ्रष्टाचारा विरूध्द 'महाभारत' घडवण्याची.
"जोती -आवाज " जाने.१९९९ मध्ये प्रसिध्द झालेली माझी कवीता

