Monday, December 10, 2007

वाडा

तारुण्याच्या उंबरठ्यावर वाड्याला त्यांनी सोडले,

पोटसाठी भटकले , वार्धक्याच्यावेळी परतले.

एकेकाळचा राजावाडा , आज भकास झालाय,

वाड्यातली माणसं भुतासारखी राह्तायत.

स्वत:चीच डागडुजी या माणसांना जमत नाही.

वाड्याची काय करणार ?

बाहेर गेलेल्या नव्या पीढीकडेच आशेनं पाहतायत,

भकासवाडा आणि त्यातली म्हातारी भुतंही

पण नवीन पाखरे त्यांच्याच नादात आहेत.

जीर्णोध्दाराची वाट पाहणे हेच वाड्याच्या नशीबी आहे.


"चैत्रपालवी " काव्यसंग्रहामधे प्रसिध्द

0 comments:

Thank You for Visiting the Website .

About Me

काव्यतरंग !

काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२